'१८५७-बंडाचा वणवा' या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगांचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे.कंपनी सरकारच्या जुलुमांची काही सैनिकांवर पडलेली ठिणगी कशा प्रकारे पेट घेत संपूर्ण हिंदुस्थान भर वणव्याचे रूप धारण करत गेली हा सर्व प्रवास वाचकाला खिळवून ठेवणारा आणि स्तब्ध करणारा आहे.ब्रिटिश कंपनी सरकारने या वणव्याचा बिमोड करून नवी राजसत्ता प्रस्थापित केली असली तरी हिंदुस्थानच्या क्रांतीचा हा भडका संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरित करणारा होता. या वणव्यात आहुती म्हणून समर्पित झालेल्या प्रत्येक सैनिकाचे स्थान धृव ताऱ्याप्रमाणे अढळ आणि अबाधीत आहे. देशभक्तीने प्रेरीत करणारी ही कादंबरी 'वरदा प्रकाशनाने' प्रकाशित केलेली आहे. ही कादंबरी प्रत्येक वाचकाला १८५७ च्या त्या कालखंडात घेऊन जाण्याचा अनुभव करून देण्यास पूर्णपणे समर्थ आहे.