Aithihasik striya
Marathi
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

आपल्या देशात 'रामायण-महाभारत' काळापासून 'स्त्री'- पुरुषांसमान मानण्याइतकी ती धाडसी होती ह्याची अनेक उदाहरणे आहेत तसेच अभ्यास केला तर त्या काळातल्या आणखीही 'कर्तत्ववान' अशा स्त्रिया उजेडात येतील. रामायणकाळात राणी कैकयीने रथात दशरथाबरोबरीने युद्धात एका सहाय्यकाची भूमिका वठवताना आपल्या हाताची 'आरी' (axle) करून हलणारे रथचक्र फिरतेच ठेवले आणि वेळ साधली! युद्ध जिंकले !! हे काम 'साधे' नव्हते... महाभारतकाळात 'विराटाच्या' राज्यात सैरंध्री नावाची दासी बनून रहाताना तेथील 'कीचक' नावाच्या राक्षसी सेनापतीला कायमची अद्दल द्रौपदीने भीमसेनाकडून घडविली. अन् हेही काम स्त्रीला मानसिकदृष्ट्या धाडसाचेच ! त्यामुळे त्या दोघींना त्यांच्या काळात पुरुषांसमान हक्क मिळाले मान मिळाला. त्या काळापूर्वीही स्त्रिया 'कर्तृत्व' गाजवून गेल्या असतीलही त्यांचाही अभ्यास झाला तर कळेल.पण त्या काळानंतर एका प्रदीर्घ कालखंडानंतर भारतातल्या समाजव्यवस्थेवर म्हणण्यासारखे नियंत्रण नसावे. मग एकदम 'सम्राट अशोक याचा उदय झाला' मग राजवटीही बदलत गेल्या मग मुसलमानी मराठेशाही-शिवकालीन मग पेशवाई मग तर ब्रिटिशकाळ पुढे १९४७ ला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्ती असे एकंदर भारतीय इतिहासाचे धावते वर्णन करता येईल. ह्या एकूण इतिहासात भारतात आपोआपच भाषावार प्रांतरचना झाली आणि राजेशाहीही येऊन गेली त्या काळातही स्रिया आपले कर्तव्य उजळून गेल्या त्याच काळात आपली 'भारतमाता' सर्वच दृष्टीने 'सुजलाम सुफलाम' होती. स्त्री-पुरुष समान हक्काने समाजात वावरत असत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE