इतिहास नानाविध व्यक्तींच्या पराक्रमाने बनतो अर्थात त्या व्यक्ती कोणत्या घराण्यातल्या कशा पुढे आल्या त्यांचे जन्म- मृत्यू केव्हा कसे झाले त्यांची समकालीन परिस्थिती कशा प्रकारची होती हे तपशील जितक्या विपुलतेने उपलब्ध होतील तितका तो इतिहास भरीव व मार्गदर्शी बनेल. व्यक्तीची कुटुंबे बनतात आणि कुटुंबांनी समाज व राष्ट्र बनत जाते. यास्तव व्यक्तीचा व कुटुंबांचा भरपूर तपशील वाचकांपुढे येण्यास वंशावळी हे एकमेव महत्त्वाचे साधन सदैव हाताशी सिद्ध पाहिजे तरच तो इतिहास उपयोगाचा होईल.