श्यामची आई' हे पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सत्त्याऐंशी वर्ष झाली आहेत. डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात की ज्ञानेश्वरीनंतर सर्वांत जास्त वाचले गेलेले पुस्तक म्हणजे 'श्यामची आई' ! हे मराठीतील व भारतातीलच चिरंतन टिकणारे अजरामर पुस्तक आहे. तिसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोनशे पानांचे पुस्तक वाचणे कठीण वाटते म्हणून साने गुरुजींच्या शब्दांतच या पुस्तकाचे पुनर्लेखन केलेले आहे. महाराष्ट्रातील बालकुमार या पुनर्लेखन केलेल्या नव्या आवृत्तीचे स्वागत उत्साहाने करतील अशी खात्री आहे.