देशातील नावाजलेल्या वर्तमानपत्रातील एका शांत संयत व्यंग्यचित्रकाराचे एका लढाऊ राजकीय संघटनेच्या जहाल नेत्यात रुपांतर कसे झाले? साठच्या दशकात त्याने भूमिपुत्रांसाठी उभारलेल्या संघटनेने मराठी माणसाच्या रोजगाराच्या हक्कासाठी केलेल्या मागण्या आणि दक्षिण भारतीय व कम्युनिस्टांवर चढवलेल्या हल्ल्यांमुळे मुंबई कशी हादरली ? आक्रमक महाराष्ट्रधर्माची भलामण करतानाच त्याने कडव्या हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर कसा घेतला आणि भारताच्या राजकीय अजेंड्यावर हिंदुत्व कसे आणले ? देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्याने आपल्या मुठीत कशी ठेवली ? त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर कसे घडवले? लाखो मनांवर अधिराज्य गाजवतानाच अनेकांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड दहशत कशी निर्माण झाली ? कोट्यवधींची उलाढाल असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगावर त्याने आणि शिवसेनेने आपला धाक कसा निर्माण केला ? भारतीय जनता पक्षाशी त्यांची युती दीर्घ काळ कशी टिकली ? केवळ भारतभरातच नव्हे तर पाकिस्तानातही हे व्यक्तिमत्व कुतुहलाचा विषय कसे बनले ? हे पुस्तक म्हणजे बाळ ठाकरे या वादळी व्यक्तिमत्वाची कहाणी आहे. शिवसेनेचा उदय यशापयश आणि त्यातील बंडखोरीचीही ही कथा आहे. ठाकरे यांच्या व्यक्तित्वाचा घेतलेला वेध त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व शिवसेनेसारख्या लढाऊ राजकीय संघटनेची त्यांनी केलेली उभारणी त्यांच्याभोवती उभे राहिलेले वाद आणि वादळे राज आणि उद्धव या चुलतभावांमध्ये रंगलेला संघर्ष बाळासाहेबांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणामधील झालेला युगान्त आणि शिवसेनेच्या भवितव्यापुढे उभे राहिलेले प्रश्नचिन्ह यावरही हे पुस्तक साक्षेपाने प्रकाश टाकते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.