Awarded by Limca book of records - Longest Poem In India.कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी सलग २५ तास अध्यापनाचा विश्वविक्रम केला असून या विक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली आहे. एका तासात ऐनवेळी दिलेल्या विषयांवर २५ कविता लिहिण्याचा विक्रम केला असून त्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली आहे. या दोन विक्रमांच्या नंतर ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर दीर्घकविता (सर्वात मोठी) लिहिण्याचा तिसरा विक्रम त्यांच्या नावावर लवकरच ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्’ ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ अशा तीन रेकॉर्डस् बुक मध्ये नोंद होत असून कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डस् बुक्स मध्ये स्थान मिळवणारे कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर हे एकमेव मराठी कवी असावेत असे मला वाटते.