वसुधा सरदार यांचं हे लेखन स्वानुभवातून आलेलं असून ते प्रसन्न करणारं वाचनीय आहे. शिवाय ते डोळे उघडायला लावणारं आणि मानवी अस्तित्वाविषयी त्याच्या श्रमांविषयी धडपडींविषयी भल्या जगाच्या स्वप्नांविषयी नवी नजर देणारंही आहे. त्यामुळे अर्थातच ते माणूस म्हणून मनाची मशागत करणारंही आहे. ‘लोकांसाठी नव्हे लोकांबरोबर काम’ ही वसुधाताईंची भूमिका आहे. हे पुस्तक वाचतानाही आपल्याला त्या त्यांच्यासोबत घेऊन जातात. शहरी असो की ग्रामीण स्त्री-पुरुष सर्व वाचकांना आवडेल अंतर्मुख करेल कृतीची प्रेरणा देईल असं हे लिखाण आहे. लेखिकेविषयी : वसुधा सरदार सेंद्रिय शेती आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. २००३ पासून त्या सेंद्रिय शेतीचा अवलंब करतात. तसंच सेंद्रिय सेतू या नावाने सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन आणि विक्रीही करतात. १५ गावांत सुमारे २०० महिला बचतगटांची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यामधून त्यांनी महिला विकासाचे व प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.