<p><span style=color: rgba(15 17 17 1)>मोक्ष गीता हा गीतेचा अंतिम अध्याय. या अध्यायात केलेली गीतेची उजळणी म्हणजे जणू काही अर्जुनाच्या अज्ञानावर सजगतारूपी हातोड्याने केलेला अंतिम प्रहारच होय. या अध्यायात अर्जुनाला श्रीकृष्णाकडून ती अंतिम युक्ती समजली ज्याद्वारे तो पूर्वीच्या आणि भावी बंधनांपासून वाचू शकला. ही अंतिम युक्ती म्हणजे शुभक्ती. या शुभक्तीमध्ये भक्ती शक्ती युक्ती आणि मुक्ती या सर्व बाबी सामावलेल्या आहेत.</span></p>