श्रीमन्महाराधिराज महिमहेंद्र यावदार्यकुल-दिवाकर महाराणाश्रीप्रतापसिंह महाराज या राजर्षींच्या सत्कीर्ती श्रवणाने ज्याचे मन स्वाभिमानानेप्रेरित होऊन प्रमुदित झाले नाही असा या भरतखंडात एकही सुशिक्षित आढळणार नाही. त्याराजर्षींच्या समकालीन भाट चारण वगैरे स्तुतिपाठक शीघ्रकवींनी त्याच्या सत्कीर्ती वर्णनांचीकवने निरनिराळ्या प्रसंगी इतर रजपूत योद्ध्यांना ऐकवून त्यांना स्वकर्तव्याविषयी उत्साहितकेले आहे. ती कवने राजस्थानात अद्यापि प्रसिद्ध आहेत. तसेच आधुनिक काळात जे जे इतिहासकारकादंबरीकार नाटककार व कवी होऊन गेले त्यांच्यातील पुष्कळांनी सदरहू राजर्षींच्या सत्कीर्तीचेवर्णन करण्यात धन्यता मानून आपली कुशल लेखणी पवित्र करून घेतली आहे. तरी त्याच्या सत्कीर्तीचेयथातथ्य वर्णन झाले असे वाटून कोणाचेही समाधान झालेले नाही. त्याच्या आयुष्यातील प्रत्येकप्रसंग त्याच्याच कारकिर्दीत मेवाडच्या रमणीय व पवित्र भूमीवर प्रत्येक ठिकाणी अंकितझालेला असून पाहणारास ते प्रत्येक ठिकाण म्हणजे या राजर्षींच्या इतिहासाची पृष्ठे निसर्गदेवीने मोकळी करून मेवाडदेशभर पसरून ठेविली आहेत की काय असा भास होतो. राजस्थानचा इतिहासकारकर्नल टॉड ह्या तिर्हाईत इसमाने आपल्या लेखात ठिकठिकाणी या राजाविषयी जे उद्गार काढलेआहेत ते वाचले म्हणजे ह्याची योग्यता केवढी मोठी होती हे चांगले लक्षात येते.