* जग एकमेकांशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा याचे विश्लेषण म्हणजे ''जग बदलताना'' हे पुस्तक! * जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. * जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. * चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदले आहेत. ते कसे यांची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय सामाजिक सहकार आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण पर्यावरण दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. ''मोदी २.०'' (भाग १ ते ३) ''अस्वस्थ पर्व'' ''मोदीपर्व'' ''धुमाळी'' ''राजपाठ'' ''जगाच्या अंगणात'' ''ड्रॅगन उभा दारी'' या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ''संवादक्रांती'' या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.