सर्वसामान्य कुटुंबाच्या जीवन संघर्ष कथांचा समावेश या कथासंग्रहात आहे. यातील कथा या एकाच वेळी संघर्ष कथा आणि धैर्य कथा आहेत मोठ्या संकटातून वाट काढण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या प्रेरणादायी कथा आहेत. साध्या सोप्या आणि ओघवत्या कथा आहेत. मनाला भावणाऱ्या मनासमोर उभ्या राहणाऱ्या कथा आहेत. स्वतःचे आणि दुसऱ्याचे हित साधणाऱ्या या अनोख्या कथा आहेत. वाचन चिंतन मनन मंथन आणि लेखनातून निर्माण झालेल्या या काशीराम बोरे यांच्या वाचनीय अशा एकूण नऊ कथा या कथासंग्रहात आहेत. लेखकाविषयी : लेखक काशीराम सखाराम बोरे यांनी शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून अडतीस वर्षे काम केले आहे. सध्या ते सेवानिवृत्त असून कविता लेख कथा लिहिणे हा त्यांचा छंद आहे. त्यांना झाडे लावायला आवडतात झाडांच्या संवर्धनासाठी ते सक्रियपणे सहभागी होतात. त्यांना त्यांच्या शैक्षणिक सेवेत अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘पालवी’ हा त्यांचा पहिला बाल-कवितासंग्रह आहे. ‘कर्मफल’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.