हे पुस्तक मुख्यत: श्रमिक म्हणजे कष्टकरी वर्ग आणि निम्न मध्यम वर्ग यातील बंधुभगिनींसाठी आहे. त्यांनी हे पुस्तक लक्षपूर्वक वाचावे. ऐकावे. शक्य झाले तर चर्चा करावी. काय लिहिले आहे ते समजून घ्यावे. हे आपल्या उपयोगाचे आहे की नाही हे स्वत:च्या बुद्धीने विचार करून ठरवावे. यातील विचार पटले तर आचरणात आणावे. म्हणजे तसे वागावे. कष्टकरी बंधुभगिनींची प्रगती व्हावी त्यांनी पुढे जावे. याच एका हेतूने हे पुस्तक लिहिले आहे.