पुस्तकाविषयी : कवी आणि गझलकार अरुण कटारे यांनी ‘काट्यातले मोरपीस’ या त्यांच्या काव्यसंग्रहात चार-चार ओळींच्या एकूण पाचशेएक (५०१) कविता अष्टाक्षरी स्वरूपात लिहिलेल्या आहेत. हा त्यांचा चौथा कवितासंग्रह आहे. वाचकांना समजेल अशा सोप्या आणि साध्या भाषेत त्यांनी या अष्टाक्षरी रचल्या आहेत. दोन अष्टाक्षरी जोडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. ज्याप्रमाणे गझलमध्ये ‘शेर’ असतात त्याप्रमाणे कवीने एकेक विषय स्वतंत्रपणे मांडायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक अष्टाक्षरी ही स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. कविता वाचणाऱ्या सर्व रसिक वाचकांना आणि कविता करणाऱ्या अनेक नवकवींसाठी हा काव्यसंग्रह संग्रहित ठेवण्यासारखा आहे. कवीविषयी : कवी आणि गझलकार अरुण प्रभाकर कटारे यांनी कुसुमाग्रज यांच्याकडून काव्यलेखनाचे आणि सुरेश भट यांच्याकडून गझललेखनाचे धडे घेतले आहेत. त्यांचे ‘ठसा’ ‘सार्थक’ आणि ‘जपून ठेव’ हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर अनेक कवीसंमेलनात सहभाग घेतला आहे. त्यांना काव्यलेखनासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचा गझलसंग्रह हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.