स्वातंत्र्यपूर्वकाळात आयसीएस अधिकाऱ्यांनी वनस्पती जनजाती आणि इतिहास या क्षेत्रात संशोधन लेखनाचे अतिशय मोलाचे काम केले आहे. ही अतिशय आश्चर्यकारक बाब आहे. जॉर्ज अरवेलचा अपवाद वगळता इतर कोणाही आय. पी. अधिकाऱ्याचे उल्लेखनीय काम आढळून येत नाही. ब्रिटिशांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या तुलनेत आयपीएस अधिकारी कमी वकुबाचे असल्याचे वाटल्यामुळे कदाचित असे झाले असावे. कदाचित त्यांना आपले प्रशासन चालविण्यासाठी जास्त बुद्धिमान आणि संवेदनशील आयपीएस अधिकाऱ्यांची आवश्यकता नसावी. स्वातंत्र्यानंतर मात्र ही परिस्थिती वेगाने बदलली. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांत बौद्धिक आणि शैक्षणिक समानता येताच दोघांच्या रचनात्मक कार्यातील फरक कमी व्हायला लागला. आता तर उलट असे म्हणावे वाटते की आयएएस अधिकाऱ्यांच्या तुलनेत आयपीएस अधिकारीच लेखनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या जास्त व्यापक अनुभवामुळे असे होत असावे. भाषा शैली आणि दर्जाच्या पातळीवर पोलीस लेखकानी लिहिलेले साहित्य कोणत्याही कसोटीवर पारखले जाऊ शकते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.