परधानजी राज्याची परिस्थिती कशी काय हाये? हा आपल्या वगामध्ये नेहमी विचारला द्वारा प्रश्न. मग प्रधानजी त्यावर अत्यंत बोचणारे मार्मिक भाष्य करतो ज्यामुळे राजाला जाग येते. च जाग आणण्याचं काम अंतर्बाह्य अस्सल पत्रकार असलेल्या संदीप काळे यांनी राज्यभर ती करून सकाळच्या माध्यमातून अवघ्या राज्याला आणली आहे. विजय तेंडुलकर आणि नल अवचट यांच्या कुळातले हे लेखन वाचकाला अंतर्मुख तर करतेच पण आपल्या सामाजिक कीय स्थितीचा विचार करायला लावते आणि मुख्य म्हणजे वाचकाला कृतिशील करते.या सर्व लेखांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. हा माणूस वंचित शोषित पीडित कामगार कष्टकरी आणि कामकरी वर्गातील आहे. त्यांच्यासमोर आपल्या आजच्या व्यवस्थेने लादलेले आणि रोनामुळे अधिक गहिरे झालेले प्रश्न आ वासून उभे ठाकलेले आहेत. माणूसकी आता फक्त स्थानातच उरलीय काय? हा तिथे तीरासारखा खोलवर घुसलेला आहे.वेश्या मासेमार लहान मुले-मुली तृतीयपंथी शेतकरी पत्रकार रस्त्यात गाणारा बेसहारा ड कब्रस्थान कामगार रेल्वे स्टेशनवरील निराधार काश्मीरमधील एकटा जवान आणि तिथला स्लिम मुलगा वगैरे विविध विश्वातील लोक संदीप काळे यांच्या लेखनाचे नायक आहेत. हे साधे यक वाचकांचे हृदय हेलावून निष्ठा दाखवत लढायचे बळ देतात. प्रश्न आणि उपाय दाखवणारे बळेंचे हे सारे लेखन म्हणजे आत्ताच्या काळातील समाजशास्त्रीय अभ्यास आहे.अशा लेखनाला आवश्यक अशी सहृदयी करुणा आणि कळीचे प्रश्न उपस्थित करण्याची नर्भिडता पत्रकार आणि लेखक म्हणून संदीप काळे यांच्यात खणखणीत आहे. तिच्या स्पर्शनि बाचकाला भवतालचे आकलन होते आणि या भ्रमंतीमुळे वाचणाऱ्यांची भ्रांती दूर होते. हेच त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य आहे।तिला माझा सलाम!-अतुल पेठे (ज्येष्ठ रंगकर्मी)
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.