महाराष्ट्राची संत परंपरा या पुस्तकात तेराव्या शतकातील ज्ञानदेव नामदेववादि संतांपासून विसाव्या शतकातील संत तुकडोजी पर्यंतच्या सर्व संतांच्या जीवन चरित्रांचा समग्र पद्धतीने वेध घेतलेला असून त्यांच्या अध्यात्मिक पारमार्थिक साहित्यिक व सामाजिक कार्याचा अत्यंत साध्या व सुलभरीतीने विवेचनात्मक आढावा घेतलेला आहे. भागवत संप्रदायाच्या सर्व जिज्ञासू भाविक वारकऱ्यांसह सर्वसामान्य जणांना संतांच्या चरित्राचा परिचय एकाच पुस्तकात प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने संत साहित्याचा संशोधनात्मक धांडोळा घेतला असून त्यातून संतांच्या त्यागमय परोपकारी व सेवाभावी वृत्तींचा साक्षात्कार होऊन संतांनी समाजासाठी जे योगदान दिलेले आहे त्याची सर्व स्त्री पुरुष वाचकांना प्रचीती येईल याची खात्री आहे.