Mahasattechya Watewar
Marathi

About The Book

माहितीपर आणि प्रबोधनात्मक अशा १० लेखांचा संग्रह असलेले हे युवराज कोरे लिखित पुस्तक म्हणजे जनजागृतीचा एक वेगळा प्रयत्न आहे. रेशनकार्ड, शेतजमिन, पर्यावरणीय समस्या या संदर्भातील सर्वसामान्य जनतेला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयावर लिहिलेल्या लेखातून लेखकाने दिली आहेत. तरुणांनी जरूर पाहावेत अशा चित्रपटांची सविस्तर यादीही त्यांनी एका प्रकरणात दिली आहे. अनेक कागदपत्रांचे आणि अर्जांचे नमुनेही त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहे. आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये पुरंदर किल्ल्याचे मनोगतही त्यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आपण एका विशिष्ट भूमिकेतून लिहिलेले आहे हे लेखकाच्या मनात स्पष्ट आहेच पण त्याचबरोबर त्यांनी प्रस्तावनेत ते अधोरेखित केले आहे. ते म्हणतात, “या पुस्तकाचा हेतू समाज प्रबोधन करणे आहे. वाचकांची घटकाभर करमणूक करणे असा हेतू नाही. करमणुकीसाठी बाजारात इतर पुस्तके भरपूर मिळतात.सदर पुस्तक समाजातील कोणत्या ही गटावर-घटकावर, तसेच वैयक्तिक टीका करणारे नाही. तसा पुस्तकाचा हेतू नाही. समाज प्रबोधन करणे, समाजाला योग्य दिशा देणे, जीवन कसे सुखी करावे, देश महान कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणारे आहे.”लेखकाविषयी : युवराज कोरे यांना पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहेत. यातूनच सर्वसामान्य जनतेला भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्यांचा अभ्यास आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE