Mahavinashachi Padachinhe
Marathi

About The Book

आज मानवी जगण्यात वृक्षसंवर्धन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. झाडांचे महत्त्व पटवून देण्यासाठी लेखक भाऊराव मुळे यांनी आपल्या लेखणीतून हे नाटक लिहिले आहे. ‘झाडांना जगवा आणि जगू द्या’ हा संदेश त्यांनी या नाटकातून दिला आहे. सर्वसामान्य माणसांना झाडांविषयीची सखोल माहिती व्हावी त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा हा या नाटकाचा उद्देश आहे. विविध वृक्ष हीच नाटकातील पात्रे आहेत. अतिविकासाकडून महाविनाशाकडे चाललेली आपली वाटचाल नाट्यरूपात दिली आहे मानवाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाची भीषणता आपल्या पुढ्यात प्रत्येक झाडाच्या तोंडून मांडणारे हे वाचनीय आणि अर्थपूर्ण नाटक. लेखकाविषयी : लेखक भाऊराव मुळे हे सेवानिवृत्त असून सध्या त्यांचे वास्तव्य नागपूर येथे आहे. त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित असून एक कथासंग्रह आणि एक लेखसंग्रह प्रकाशित आहे. ज्योतिषशास्त्रावर आधारित त्यांची काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE