‘माणूस म्हणून जगा’ हा कवितासंग्रह असून त्यात शंभरहून अधिक कविता आहेत. हा कवितासंग्रह सामान्य माणसाच्या अनुभूतींवर आधारित आहे. प्रत्येक कवितेतून कवी उदय माळगांवकर हे सकारात्मक संदेश देतात आणि जगण्यातला आशादायी दृष्टिकोन मांडतात. अनुभवाचा सच्चेपणा व्यापक आणि उदात्त विचारांचा गाभा ईश्वरी श्रद्धेचा भक्तिभाव आणि स्त्री सन्मानाची आत्मीयता या कवितासंग्रहात दिसून येते. आज ना उद्या यश हे निश्चित मिळते हा संदेश ‘माणूस म्हणून जगा’ या काव्यसंग्रहातून कवी देतात. कवीविषयी : कवी उदय माळगांवकर हे अभियंता असून सध्या ‘टाटा मोटर्स लिमिटेड पुणे’ येथे ते उच्च पदावर कार्यरत आहेत. ते एक कवी लेखक प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते देखील आहेत. सतरा देशांत आणि सत्तरहून अधिक शहरांत त्यांनी वास्तव्य केले आहे. ‘स्वतःला ओळखा आयुष्यात जागेपणी’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ‘संस्कारांचा वज्रलेप’ हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे.