आपले गर्भाशय भाड्याने देऊन जन्म दिलेल्या बाळाला मिळणारे मातृत्व असो किंवा स्वतःच्या गर्भाशयातून जन्म दिलेल्या बाळाला मिळणारे मातृत्व वेगवेगळ्या पद्धतीचे असले तरी त्या मातृत्वातील भावना एकच असतात. त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाप्रती असणारी ओढ त्या प्रति असणारी ममता एकच असते. त्यामुळे हे मातृत्वाचे प्रेम ममता; आपल्या काळजाचा तुकडा यातील वात्सल्य ज्याला मिळते तो भाग्यशाली समजला जातो. परंतु हे वात्सल्य ज्याच्या नशिबी येत नाही त्याचे जीवन किती दुर्भाग्यशाली बनून जाते ? हेच या कथेचे सत्य स्वरूप आहे.