पांढर' (थोरातवाडी) या कांदबरीतील मेंढपाळांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी केवळ मेंढीपालनाचा व्यवसाय करुन श्रमदेवतेची उपासना केली. मोठ्या कष्टाने शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आणि शेतीच्या विकासासाठी जमीन सपाटीकरण करणे विहिरी खोदणे पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वीपणे राबविणे या प्रकारच्या प्रयत्नातून शेती समृध्द केली. स्वतःसाठी घरे बांधली शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय करुन आर्थिक स्तर उंचावला याशिवाय अंधश्रध्दा नष्ट करुन हे छोटे गाव संपूर्णत: व्यसनमुक्त केले याचे सर्व श्रेय आजच्या नवीन पिढीतील युवकांना जाते. त्यांच्या अपार कष्टाची ही प्रेरणादायक यशोगाथा निश्चितच वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.