पैशामध्ये मोठी शक्ती आहे हे तर खरेच. त्यामुळेच जगातील असंख्य लोक पैशाच्या मागे उभे आयुष्य धावत असतात. पण पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी वाटत नाही. पैशाची शक्ती गरजूंना मदत करण्यासाठी विधायक पद्धतीने वापरल्यास आणि स्वतःबरोबरच समाजातील गरजूंसाठी पैशाचा विनियोग करण्याचे धोरण ठेवल्यास मिळणारे समाधान शतपटींनी अधिक असते हे या चिंतनपर पुस्तकात सांगितले आहे. लेखकाविषयी : प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान अध्यात्म नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.