पांडवांना जे यक्षप्रश्न विचारले त्यामध्ये एक प्रश्न असा होता. कोणत्या दोन गोष्टी आपल्या हातातून गेल्या सुटल्या की आपल्याकडे परत येत नाहीत ?”ह्यापैकी एक गोष्ट - म्हणजे 'धनुष्यातून सुटलेला बाण'. ही एकच गोष्ट बाकीच्या पांडवांनी सांगितली ते यक्षाच्या परिक्षेत नापास झाले. पण एकट्या 'धर्मराजाने' दुसऱ्याही गोष्टीचे नांव सांगितले आणि त्यामुळे सर्व पांडव शुद्धीवर आले. जे नापास होऊन बेशुद्ध झाले होते-- ती धर्मराजाने यक्षाच्या प्रश्नाला उत्तर दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे 'वेळ' हातातून वेळ गेली की पुन्हा तीच वेळ परत येत नसते.....या एकाच प्रसिद्ध उदाहरणावरून..... प्रत्येकाने वेळेची किंमत ही ठेवलीच पाहिजे अन् प्रत्येकाच्या जीवनात 'जर तो पहाटे लवकर उठला तरच तो' प्रत्येक क्षण अथवा 'मिनिट' वापरून त्याची किंमत मिळवू शकेल... दुसरं उदाहरण श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी स्वतःला घोड्यावरून जाताना झोप घेण्याची सवय लावली होती. ते दिवसां झोपत नसंत. ते केवळ 'प्रत्येक मिनिट उपयोगात आणण्यासाठी'.