स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन देशाची सेवा करणे हे देशातील बऱ्याचशा तरुणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी दरवर्षी हजारो परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात येतात. त्यांचे जीवन अगणित पुस्तकांच्या गट्ट्यांबरोबरच अभ्यास आणि दैनंदिन संघर्षाने वेढलेले असते.या परीक्षार्थींचे स्वतःचे देखील वैयक्तिक जीवन असते. त्यांच्या स्वतःच्याही काही इच्छा अपेक्षा आणि भावना असतात. त्यातील एक म्हणजे प्रेम. ते त्यांचे प्रेम जीवन आणि अभ्यास एकाचवेळी हाताळत असतात.या कादंबरीत आपण अभ्यासासाठी आणि प्रेमासाठी समर्पित असलेल्या परीक्षार्थीना भेटतो. MPSC आणि UPSC परीक्षेच्या उमेदवारांची ही संघर्ष आणि त्याबरोबरच असलेली प्रेमकहाणी आहे. ही कादंबरी पूर्णपणे परीक्षार्थींच्या वैयक्तिक सामाजिक आणि प्रेम जीवनावर आधारित वास्तविकता आहे.