शुद्ध ज्ञानाचे भांडार म्हणून वेदांकडे पाहिले जाते. चार वेदांपैकी ''ऋग्वेद'' हा पहिला वेद. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच त्यातील भौगोलिक खगोलीय ज्ञान संशोधक व अभ्यासकांना कायमच आव्हानात्मक वाटत आले आहे. या अभ्यासग्रंथातही ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ खगोलशास्त्रीय पद्धतीने लावून इंद्रादि देव देवता सूर्य पृथ्वी यांचा उगम ग्रहतारे जोडतारे द्वैती तारे इत्यादींबद्दल पौराणिक विश्लेषणांसह वैज्ञानिक स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रस्थापित समजुतींना धक्का देणारा आहे. लेखकाविषयी : श्री. बापू कुंभार रुढार्थाने संशोधक किंवा तत्त्वज्ञानाचे अभ्यासक नाहीत. पण सेवानिवृत्तीनंतर त्यांनी त्यांच्या वाचनप्रेमाला संशोधनपर अभ्यासाची जोड दिली. आणि त्यातून हा अभ्यासग्रंथ सिद्ध झाला.