तत्कालीन महाराष्ट्रातील मरगळलेल्या चेतनाहीन समाजाला संघटित करून बलोपासनेचा संदेश देण्यासाठी बुद्धी आणि शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मारुतीरायांची उपासना समर्थांनी समाजासमोर ठेवली. समर्थांनी भारतभर जरी शेकडो मंदिरे स्थापन केली असली तरी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांतील समर्थस्थापित अकरा मारुतींचे वैशिष्ट्य वेगळे आहे. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो असे समर्थांना वाटत होते. भक्तीचे अधिष्ठान ठेवून मारुतीरायांची उपासना करण्यासाठी समर्थांनी या अकरा मारुतींची स्तोत्रे रचली. या स्तोत्रांतून हनुमंताच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे. समर्थ स्थापित अकरा मारुतींचे स्थलमाहात्म्य व गुणमाहात्म्य या पुस्तकात सांगितले आहे. लेखकाविषयी : समर्थभक्त समर्थांचा वैचारिक वारसा जपणारे समर्थ विचारांचे पाईक आणि ज्ञानसंपन्न अभ्यासू वक्ते म्हणून मोहनबुवा रामदासी प्रसिद्ध आहेत. समर्थ विरचित दासबोध मनोबोध आत्माराम करुणाष्टके आणि समर्थांच्या सर्वच वाङ्मयाचा आणि समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार ते देशभर फिरून करतात.