प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे. ‘त्या फुलांच्या गंधकोशी’ हा एक खास गझल विभाग कवितासंग्रहात आहे. त्यात प्रेम अपराध लाजणे मनातले यांसारख्या विषयांवर गझल लिहिलेल्या आहेत. या पुस्तकात स्फूर्ती देणारे काव्य देखील आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यामधले नाते देखील ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’ या विभागातून कवीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सृष्टीतील सर्व घटकांबद्दल त्यांनी आपल्या काव्यातून कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि सगळ्यांना साष्टांग प्रणाम केला आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.