समज आल्यापासून सावरकरांनी भारतभूमी बंधमुक्त करण्याचे व्रत आंधळेपणाने स्वीकारलेले नव्हते. हे त्यांनी ह्या कविताचरणात सांगितले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे; जणू तेजोरश्मीने दाहक असे स्वातंत्र्यसूर्य होते. परंतु एवढ्याने त्यांचे वर्णन संपत नाही. त्यांचे जीवन म्हणजे इंद्रधनुष्यासारखा तेजोमय अनेकरंगी नानापैलू असलेला चमत्कार होता. ते उत्कट देशभक्त जहाल क्रांतिकारक तेजस्वी गद्यलेखक कुसुमकोमल कवी श्रेष्ठ तत्वचिंतक नाटककार ओजस्वी इतिहासकार शतसहस्त्रेषु वक्ता होते. त्याबरोबरच ते तत्वनिष्ठ राजकारणी क्रियाशील समाजसुधारक व विज्ञाननिष्ठ लेखक होते. ह्या अवनीतलावर असा पुरुष होऊन गेला हे भारताच्या भावी पिढ्यांना खरेही वाटणार नाही.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.