ही एक अशी कादंबरी जिने जगाला अपराधाला वाचण्याची नवीन दृष्टी दिली. यात थराराहून वेगळंही काही आहे. ही राजकारण आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित एक अशी रहस्यमय कादंबरी आहे ज्यामध्ये भावनिक आणि नैतिक मूल्यांचीही चर्चा केलेली आहे. महत्त्वाचे विचार मांडणारी ही एक रोचक कादंबरी आहे. यामध्ये सत्ता भ्रष्टाचार न्याय आणि निर्दोषत्व यांच्याशी संबंधित समस्यांचं चित्रण केलं गेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपयर्र्ंत ही कादंबरी आपल्याला रहस्यमय आणि रोमांचक अशा भयचकित करणार्या वळणदार रस्त्यांवरून घेऊन जाते. कथानक नकारात्मक असलं तरी कधीच विसरता येणार नाही अशा व्यक्तिरेखांच्या चित्रणातून लेखकाने वाचकांसाठी जणू काही एक उत्सव आयोजला आहे.